Monday, July 9, 2012

Success Mantra -- quoted Reservation Article

Success Mantra -- quoted Reservation Article
http://arvindshuklakanpur.blogspot.com/2010/11/blog-post_441.html

Monday, July 2, 2012

नवाचा पाढा गप्पा झाडा -- प्रहार 20 January, 2012



या पुस्तकात आठ गोष्टी आहेत. समुद्रापासून लांब राहणारा सूर्य आहे, दूध पिणारा बोलका साप आहे, आकाशात राहणारी गाय आहे. अशा ब-याच गमतीजमती या गोष्टींमध्ये आहेत.
‘भीम आणि घटोत्कच’ हा पहिलीच गोष्ट महाभारतातला भीम आणि त्याचा मुलगा घटोत्कच यांची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. घटोत्कच त्याच्या आईबरोबर, हिडिंबाबरोबर राहत असतो. तो खूपच ताकदवान असतो. कुस्तीत,मारामारीत आणि गदायुद्धात तो सगळ्यांना हरवत असे. त्यामुळे त्याचं त्याच्या मित्रांमध्ये खूप कौतुक होत असे. पण हा घटोत्कच खूप खात असे आणि व्यायामही करत असे. पण तो सकाळी लवकर उठत नसे. त्यामुळे त्याची एकदा ज्याम फजिती होते.

‘सापाचं स्वातंत्र्य’ ही गोष्ट विशेषत: ज्या दोस्तांना दूध प्यायला आवडत नाही, त्यांना खूप आवडेल. कारण या गोष्टीत बोलका साप आहे. या सापाला दूध प्यायला खूप आवडायचं. त्यामुळे तो एका शाळेत जाणा-या मुलाशी मैत्री करतो. ते दोघं रोज खूप गप्पा मारतात, एकत्र दूध पितात. पण लक्षात ठेवा या सापाला दूध न पिणारी मुलं अजिबात आवडत नाहीत. आणि त्यांच्याशी तो मैत्रीही करत नाही.

‘ये ये पावसा’ ही पावसाची गोष्ट आहे. सध्या काही पावसाचे दिवस नाहीत. कसे असणार दोस्तांनो? रोज रोज थंडी पडायला लागल्यावर पाऊस कुठून पडणार? पण पाऊस कसा पडतो, त्यासाठी हिमालय, वारा, सूर्य आणि पृथ्वी यांची कशी मैत्री व्हावी लागते, याची गोष्ट या गोष्टीत आहे. म्हणजे ही गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट आहे.

तुम्ही शाळेतल्या पुस्तकात किंवा शिक्षकांकडून शेखचिल्लीची गोष्ट ऐकली असेल. एक शेखचिल्ली ज्या फांदीवर बसलेला असतो, तीच फांदी तो तोडत असतो. शेवटी फांदी तुटल्याबरोबर तो फांदीसह जमिनीवर आपटतो. ‘शेखचिल्लीची गाय’ या गोष्टीतला शेखचिल्ली तितका काही वेडा नाही. आणि तो लाकूडतोडय़ाही नाही. तर तो आहे राखणदार. तो एका बागेचं राखण करत असतो. पेरूच्या झाडाखाली मऊ मऊ कापसाची गंजी असते. त्यावर बसून तो रोज बागेत चरायला येणा-या एका गायीच्या शेपटीला धरून स्वर्गात जातो. तिथे खूप मजा करतो आणि परत येतो. कारण स्वर्गात राहणारी ही गाय रोज खाली उतरून शेखचिल्लीच्या बागेत चरायला येते आणि जाताना त्याला आपल्यासोबत घेऊन जाते. पण एके दिवशी तो बागेच्या मालकालाही आपल्यासोबत स्वर्गात जाऊन येण्याचा आग्रह करतो आणि गडबड होते. कारण राखणदार असला तरी हा शेखचिल्लीही आधीच्यासारखाच थोडासा वेडपट असतो. 

बोलक्या शंखाची गोष्टही अशीच गंमतीशीर आहे. पण खरी गंमत आहे ती ‘नवाचा पाढा’ या कवितेत. ही कविता तुम्ही पाठ केली तर तुमचा नवाचा पाढाही तोंडपाठ होऊन जाईल. तर मग करा सुरुवात म्हणायला-

नवाच्या पाढय़ाची गंमतजमत, बेरजा सा-यांच्या नऊ

जरा विचार करून गणित करा रे, सगळेच नऊच नऊ

नऊ दुणे अठरा, एक आणि आठ झाले नऊ

जरा विचार करून गणित करा रे, सगळे नऊच नऊ

आहे की नाही गंमतजंमत? तेव्हा नवाचा पाढा तोंडपाठ म्हणण्यासाठी आणि बोलक्या सापाशी गप्पा मारण्यासाठी हे पुस्तक वाचा.

ये ये पावसा : लीना मेहेंदळे

परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
 पाने : 50, किंमत : 40 रुपये